निबंध कसा असावा ? How essays should be?

          निबंध लिहिणे ही एक कला आहे. एखाद्या विषयावर सुसंगतपणे आणि मुद्देसुद पणे लिहिलेले विचार म्हणजे निबंध. भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये निबंधचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही निबंधाचा प्रश्न सर्यप्रथम सोडावला काय आणि सर्वात शेवटी सोडवला काय त्या निबंधलेखनावरुन तुमची बुद्धिमत्ता, कल्पनाशक्ती व तुमच्या प्रतिभा गुणांची पारख ठरते.           निबंधाचा स्तर अधिक चांगला असेल तर गणितासारखे पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. यासाठी निबंध लिहिताना त्या विषयाच्या अनुशंगाने मुद्य्यांचा वापर करावा. आपल्या विचारांची विविधता आपल्या दैनंदिन वचनावर आणि चिंतनावर अवलंबवून असते. यासाठी ज्याला उत्तम निबंध लिहायचा आहे त्याने मिळेल ते पुस्तक त्यावेळी वाचले पाहिजे.           निबंध हे वारंवार वाचा त्याचबरोबर आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो, त्याची नोंद करून ठेवा. कारण अशी केलेली नोंद आपण निबंधात कशी वापरू शकतो याचे आकलन या पुस्तकातील निबंध वाचताना विद्यार्थ्यांना आपोआपच होईल.         ...

मला पंख असते तर - Mala Pankha Aste Tar

        परीक्षेचा निकाल पहाण्यासाठी मी शाळेत गेले आणि मला समजले मी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झाले आहे. मला इतका आनंद झाला की केव्हा एकदा घरी पोचते व ही बातमी सर्वांना सांगते असे झाले आहे. त्याचक्षणी मनात विचार आला मला जर पंख असते तर किती बरे झाले असते. अशी उडत उडत गेले असते आणि ही आनंदाची बातमी सर्वत्र पोचवली असती.

        मला पंख असते तर काय सुंदर कल्पना ! त्यावेळी मला देवाचाही खूप राग आला. काय बिघडले असते. त्याचे माणसाला त्याने पंख दिले असते, तर नाहीतरी बुद्धी, विचारशक्ती, वाचा इत्यादी अभिमान वाटावा अशा कितीतरी गोष्टी त्याने माणसाला दिल्याच आहेत. त्यात एका पंखांची भर पडली असती तर काय मजा आली असती नाही?

        मला पंख असते तर किती गमती जमती केल्या असत्या मी, माझ्या जीवनात एक वेगळाच रंग भरला गेला असता अभ्यास करून कंटाळा आला तर उंच आकाशात गोल गोल फेऱ्या मारून पुन्हा खाली उतरले असते. या प्रदूषणापासून दूर जाऊन स्वच्छ मोकळ्या हवेत श्वासोच्छवास करून पुन्हा जोमाने अभ्यासाला बसले असते. ट्रॅफिक जाम चा त्रास कधीच जाणवला नसता. रस्यावरची रहदारी टाळता आली असती. मनात येईल तेव्हा, कोठेही कितीही लांब तेही अगदी थोड्या वेळात जाता आले असते.

        आकाशातील सर्व प्रकारच्या पक्ष्यांशी मैत्री केली असती. इंद्रधनुष्यातील रंग अगदी जवळून पाहिले असते. ढगांशी लपंडाव खेळला असता उंच उंच झाडांच्या अगदी नारळाच्या सुद्धा शेंड्यांवर बसून झोके घेतले असते. आवळे, चिंचा, केळ्या झाडावरच बसून मनसोक्त खाल्या असत्या. हिमालयाच्या उंच शिखरावर बसून जगाची पाहणी केली असती. उसळत्या लाटांशी स्पर्धा करत सप्तसमुद्रांवर संचार केला असता.

        मनात अशी ही शंका आली आकाशावर सार्वभौमत्व गाजवणारे हे पक्षी मला ही पंख असणं कितपत सहन करतील. आकाशात केलेले मी अतिक्रमण ते चालवून घेतील का? कदाचित • सर्वजण मिळून मला मारतीलही. अशावेळी पंख असलेली मी एकटी कसे बरे तोंड देईन ? असो ते पाहून घेता येईल.

        पण हे सारे केव्हा ? मला पंख असते तर...

धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा.

टिप्पण्या