शामभैय्या तुला एक सांगू? रागावणार नाही ना? माझा आधार घेत बाकावर बसत महेश नं विचारल? अरे सांग की, त्यात परवानगी कसली विचारतोस? अरे दोस्त आहे म्हटलं तुझा मी त्याच्या पाठीवर थाप मारत म्हटले.
शामभैय्या, आज तू तुझ्या बाबूजींवर चिडलास ना तसा पुन्हा कधी चिडू नकोस.
अरे महेश.... पण ... मी तावातावाने बोलायला लागणार तोच मला थांबवत एका हाताने महेशने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि तो म्हणाला, शामभैय्या आज मी तुला माझी कहाणी सांगणार आहे. मी खूप लहान होतो. तेव्हा माझी आई देवाघरी गेली. माझे वडील मला जिवापाड जपायचे. पण मी फार हट्टी होतो. मी त्यांचं ऐकतच नसे. माझ्यासाठी ते स्वतःच्या हाताने माझ्या आवडीचं जेवण बनवायचे, मला आईची आठवण आली तर अंगाई म्हणायचे. पण एकदा मला ताप आला. बाबांनी माझ्यासाठी कितीतरी कष्ट केले. औषधपाणी केलं, रात्ररात्र जागरणं केली पण तो ताप माझ्या पायातली शक्तीच घेऊन गेला ठिकठिकाणचे दवाखाने केले, तीर्थक्षेत्री हिंडले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही ते नाहीच. जवळचे पैसे संपले. कष्ट करण्याची ताकद संपली शेवटी आजारी पडले ते. त्यांच्याकडे पाहून मला रडू येई. त्यांनी माझ्यासाठी कितीतरी कष्ट केले पण मी मात्र त्यांच्यासाठी काही करू शकत नव्हतो. भीक मागावी, तर लाज वाटते. अशातच माझे बाबा गेले अचानक मला बाबूजी भेटले. त्यांनी माझी व्यथा जाणली. मला घेऊन त्यांनी या विकलांग संस्थेत माझे नाव नोंदवले. मला या कुबड्या देऊन माझ्या पायावर उभे केले. इथे मला काम मिळाले. मुख्य म्हणजे जीवन जगण्यासाठी लागणारा आत्मविश्वास मिळाला आणि मग मी शिकून मोठे होण्याची बाबांची इच्छा पूर्ण करायचे ठरविले. दरम्यान बाबूजींनी मला पुस्तके आणून दिली सर्व प्रकारची मदत केली. त्यामुळेच मी आज वकील होऊ शकलो. बाबूजींमध्ये मी माझे बाबा पाहतो. त्यांच्या दृष्टीतून बाबाचं वात्सल्य पाझरतयं असं मला वाटतं. आपले आई बाबा आपल्यासाठी कितीतरी धडपडत असतात. प्रेम करतात ते आपल्यावर मग ते थोडं रागावले. म्हणून आपण इतकं नाराज नाही व्हायचं, चिडायचं सुद्धा नाही.
महेशचं बोलणं ऐकता ऐकता मी अंतर्मुख झालो होतो. त्यानं मला नवी दृष्टी दिली होती.
धन्यवाद, तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये
जरूर कळवा.
टिप्पण्या